18 July, 2009

नए नए से दर्द की तलाश में...

माझं खूप वेळा असं झालंय... की एखादा वाईट अनुभव येतो, मी प्रचंड दु:खी होते... चिडचिड करते... आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात येतं की मी पुन्हा त्याच मार्गावर चालले आहे... पुन्हा तसाच अनुभव येणार आहे... आणि कधी कधी तर असं वाटतं की मी त्या अनुभवाची वाटच बघत होते... माझा एक मित्र मला म्हणायचा- "स्वत:चं दु:ख कुरवाळत बसू नकोस..." पण बहुतेक मला तेच करायला आवडायचं... आता हळुहळु त्याचं म्हणणं पटायला लागलंय...

कित्येक लोकांबाबत मी पाहिलंय की त्यांना ते करत आहेत त्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे व्यवस्थित माहीत असतं... कारण तो अनुभव त्यांनी घेतलेला असतो एकदा... पण तरीही ते तोच मुर्खपणा करायला जातात खरं !! (हे मी सुद्धा केलेलं आहे...) की त्यांना तरीही त्यातून वेगळं काही मिळेल अशी आशा असते ?? (मला तरी होती, :D) कोणास ठाउक...! "उम्मीद पे दुनिया टिकी है" - म्हणतात, तसंच काहीतरी असावं...

नेमकं हेच स्वानंद किरकिरेंनी "खोया खोया चांद"च्या शीर्षक गीतात फार सुरेख मांडलं आहे...

ये खुश नही जो मिला,बस मांगता ही है चला...
जानता है, हर लगी का दर्द ही है इक सिला...
क्यूँ नए नए से दर्द की फिराक में, तलाश में उदास है दिल...
क्यूँ अपने आप से खफा खफा, जरा जरासा नाराज है दिल...

1 comment:

HAREKRISHNAJI said...

आप कहते थे रोने से ना बदलेगे नसीब
उम्रभर आपकी इस बात ने रो ने ना दिया ||

रोनेवालोंसे कह दे ऐ "फाकीर" उनका भी रोना रो ले जीनको मजबुरी-ये-हालात ने रोने ना दिया