15 March, 2008

मला नाही मिळाल..

एखादी गोष्ट जेव्हा मिळवण्याची इच्छा असते किव्वा त्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात, ती मिळाली नाही कि माणसाची काय प्रतिक्रिया असते?

माझ्यापासून सुरुवात करते.. मी हळहळते.. त्या गोष्टीच नेहमी दु:ख करत बसते.. आठवण काढत राहते.. मला का मिळाल नाही याचा विचार करत माझा वर्तमानातला वेळ वाया घालवते.. :-((

इतर लोक काय करतात, बघु तरी.. अस म्हटल, तर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या.. खूप कमी लोक माझ्याप्रमाणे हळहळणारे होते.. उरलेले अस म्हणणारे होते कि..
".... नाही नाही.. त्या गोष्टीत काही राम नाहिए.. (समजा ती गोष्ट म्हणजे एखद्या अभ्यासक्रमासाठी मिळणारा प्रवेश असेल, तर..) तो अभ्यास्करम करून काही फायदा होत नसतो.. ज्यान्ना इतर काही करत येत नाही ते तो अभ्यासक्रम घेतात.. "

इत्यादि.. इत्यादि.. आणि अशाच प्रकारची त्या गोष्टिच्या विरोधात अनेक वाक्य..

अशी लोक डोक्यात जातात माझ्या.. मान्य आहे, नसलेल्या गोष्टीसाठी हळहळत बसणे, त्यासाठी सध्याचा वेळ फुकट घालवणे हा मूर्खपणा आहे.. पण या लोकान्च्या प्रतिक्रिया ऎकून मला ते ढोन्गी वाटु लागतात.. ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले ती अचानक बिनमहत्वाची, फालतू कशी काय वाटू शकते? कि स्वत:ला नाहि मिळाल / मिळवता आल म्हणुन आपल्या सोयीने त्याची किम्मत ते ठरवतात?
मग पुर्वी या लोकान्चे कष्ट आणि प्रयत्न पाहून मला जो अभिमान वाटायचा तो आता रागात बदलून जातो.. स्वत:च्या (खोट्या) समजुतीखातर ते नकळत ती गोष्ट ज्यान्ना मिळाली त्यान्चा अपमान करतात अस मला वाटायला लागत.. dishonest, fake people!!

खर तर या दोन्ही टोकाच्या भुमिका झाल्या.. दु:ख न करण आणि आपल्या सोयीनुसार किम्मत ठरवुन दुसरयाचा अपमान न करण, हाच खरा शहाणपणा!